labels

Monday, 25 July 2016

मना रे........
मनाला म्हटलं
दमत कसा नाहीस
एका जागी शांत
बसत कसा नाहीस
     तुझ्या अशा वागण्यानं
     सगळे खुळा म्हणतात
     तत्वज्ञान पाजळू नकोस
     डोस तत्वज्ञानाचाच पाजतात
बंदोबस्त त्याचा कारवाया
या निष्कर्षावर पोहचलो
मनाला बांधून ठेवूया
मग आपण सुटलो
         मार्ग शोधत शोधत
         जिंदगी निघून गेली
        अट्टाहास माझा होता
        पण मनानेच मात केली
आता मात्र हरल्यावर
मनाप्रमाने वागतो
मनाकडून हरून
जीवन जगल्याचा आनंद वाटतो
    खरंच की राव
    बांधाय नको मनाला
    मुक्त बेभान होऊ दे
    आनंद तेच देईल तनाला
सागर.....

No comments:

Post a Comment